जीवन सूत्रे
ही 16 सूत्र तुमचे जीवन बदलून टाकतील !
वाचा,विचार करा .......
१- अाहे ती मंदिरे पुष्कळ अाहेत. नवीन मंदिरं उभारणी बंद करा. वर्गणी देऊ नका तोच पैसा मुलांच्या शिक्षणावर, कुटूंबाच्या अारोग्यावर, गुंतवणूकीवर करा.
२- दिंड्या, वा-या, सप्ताह यात सहभागी होऊन पापमुक्ती व मोक्षप्राप्ती नादात व्यक्ती प्रगतीचे (वेळ नि पैसा) चक्रच मारून टाकतो. पैसा व बुध्दीचा अपव्यय होतो. कर्मातच देव अाहे यावर विश्र्वास ठेवा.
३- 'माणूस सोबत काहीच घेउन जात नाही'. हे सांगण्यासाठी बुवा २०,०००रू .घेतो. या बाबांचा नाद सोडा. शेती, व्यवसाय, अाराेग्य, गुंतवणूक यांच्याशी निगडीत विचारवंतांच्या व्याख्यांनांचे अायोजन करा.
४- शेतीतील, कुटूंबातील, गावकूसातील वाद समापोचाराने मिटवा. काेर्ट, कचे-यांचा मार्ग टाळा.
५- कुटूंबातील सदस्यावर सर्वात जास्त प्रेम करा. त्यांच्यासाठी वेळ द्या. सुख-दू:खात तेच तुमची जास्त काळजी घेणारे अाहेत.
४- शेतीवरच अवलंबून न राहता हळूहळू उद्याेग-व्यवसायाकडे वळा. आणी एकमेकानां व्यवसायाठी शक्य तेवढी मदतकरा.
५- "अापण सर्व जाती-धर्मांचा अादर करा. जातीवादाच पाप अापण तरी करू नका.
६- मोडेल पण वाकणार नाही. या स्वभावात बदल करा. काळ खूप बदललाय याचे भान असू द्या.
७- राजकारण व राजकारणी यांचा नाद सोडा. या दोहोमुळे समाजाचे खूप मोठ नूकसान झालेय.अाता बदला म्हणजे पुढच्या अनेक पिढ्याचं कल्याण होईल. यांचा फक्त मत "दान" पुरताच विचार करा.
८- किमान ८ तास काम कराच. (कुठल्याही क्षेत्रात)
९- खेकडा वृत्ती सोडून समाजातील इतराना मदत करा. एकमेकांना साह्य करा.
१०- नियोजन व काटकसरीने (अाहे त्या उत्पन्नात) जीवन जगा. भोगवादाच्या नादात कर्जबाजारी होऊच नका.
११- यात्रा जत्रा सत्यनारायण वास्तुशांती जागरणगोंधळ डोहाळे (अोटीभरण) पाचवी बारावी वाढदिवस मर्यादीतच ठेवा.
१२- भांडकुदळ लबाड पैसे बुडवणाऱ्याच्या पासुन लांब रहा. मदत करणाराचे कायमच ऋणी रहा.
१३- घरातील महीलांना मानाची वागणूक द्या. मुलींना उच्च शिक्षित करा.
१४- महिलांना मंदिरं, उपासना, कर्मकांड यातून बाहेर काढा अाणि व्याख्यान, उद्बोधन वर्गाला न्या. त्यांच्या हातातील पोथ्या-पुराणांची संख्या कमी करा व इतिहास, विज्ञानाची पुस्तक हातात द्या.
१५- कर्मकांड करणे टाळा. त्यामुळे तुमचा खिसा रिकामा होतो.
१६- आपण कमविलेल्या पैश्यातुन आपल्या कुटुंबाला खुप खुश ठेवा.
Comments
Post a Comment